मराठा समाजाच्या प्रश्नावर सुरू झालेले आंदोलन जिवंत आहे, याचा कधीही उद्रेक होऊ शकतो नरेंद्र पाटील यांनी दिला आहे. पाटील म्हणाले, आपल्यात आणि संभाजीराजे यांच्यात कोणताही इगो नाही. मी त्यांच्या मुंबईच्या आंदोलनातही सहभागी झालो होतो .संभाजीराजे मोठे आहेत त्यांनी सर्वांना घेऊन आंदोलन करावं. सोलापुरात मराठा क्रांती मोर्चा च्या पुढाकाराने मोठा आंदोलन हाती घेतलं होतं. यावेळी संभाजीराजांच्या सोलापुरातील समर्थक कार्यकर्त्यांनी विरोधात काम केलं. हे बीजेपीच आंदोलन आहे असा अपप्रचार ही केला हे आयोग्य होतं . पण तरीही आम्ही आंदोलन यशस्वी करून दाखवलं.
मराठा समाजाचे प्रश्न सुटले पाहिजेत हीच आमची ध्येय भूमिका आहे .आर्थिक योजना तातडीने लागू करा, त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्या .सुप्रीम कोर्टात अनेक मुद्द्यांवर विद्यमान सरकारच्या वतीने घेण्यात आलेली भूमिका आक्रमक आणि अभ्यासपूर्ण नव्हती असेही नरेंद्र पाटील म्हणाले. न्यायालयीन प्रक्रियेत हा मुद्दा अडल्यामुळे आंदोलन संपलं असं नाही. आमचे आंदोलन कायम जिवंत आहे, याचा कधीही उद्रेक होऊ शकतो असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
राज्यात सध्या इडीच्या धाडी पडत आहेत याचं नरेंद्र पाटील यांनी समर्थन केलं. ते म्हणाले, काहीतरी चुका झाल्या आहेत म्हणून अधिकारी घरापर्यंत पोहोचले आहेत. कोरोना काळात सारे काही बंद होतं .लोकांकडे पैसे नव्हते तेव्हा ही मंडळी इमारती विकत घेत होती .कुठून आला पैसा याचा हिशेब मिळालाच पाहिजे. सरकारी यंत्रणा त्यांचं काम करत आहे आपण त्यात हस्तक्षेप कशाला करावा. या पत्रकार परिषदेत वेळी मराठा क्रांती मोर्चा चे सोलापुरातील कार्यकर्ते किरण पवार ,राम जाधव ,अनंत जाधव आदी उपस्थित होते .
0 Comments