सांगली : रमजान ईद च्या दिवशी सांगलीतील मनेर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.मिरजेतील ईदगाहनगर येथे झोपडपट्टीत शुक्रवारी गरम शिरखुर्म्यात पडल्याने दीड वर्षे वयाच्या बालकाचा मृत्यू झाला. अरहान मोहसीन मणेर असे मृत बालकाचे नाव आहे.
ईद निमित्ताने मनेर कुटुंबात शिरकुरमा करण्यात आला होता. घरात काॅटखाली गरम खिरीचे पातेले ठेवून मणेर कुटुंब घराबाहेर इतर कामात गुंतले होते. यावेळी पलंगावर झोपलेला दीड वर्षाचा अरहान उठल्यानंतर काॅटवरून खाली उतरताना गरम खिरीच्या पातेल्यात पडला. अहरानच्या रडण्याचा आवाजाने सगळे खोलीत पळत आले तोपर्यंत तो ८०% भाजलेला होता. तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला.
0 Comments