बार्शी/प्रतिनिधी:
सोलापूर जिल्ह्यातील ६५७ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सोमवारी अखेरच्या दिवशी ५ हजार ८७७ जागासाठी १२ हजार २२५ उमेदवार निवडणूक रिंगणात असणार आहेत. त्यातील जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. आशिया खंडात सर्वांत मोठी समजली जाणाऱ्या अकलूज ग्रामपंचायतीची एक जागा बिनविरोध झाली असून, उर्वरित १६ जागांसाठी ४७ उमेदवारांनी दंड थोपटल्याने नगरपरिषद होण्यासाठी घातलेल्या बहिष्काराच्या पार्श्वभूमीवर अखेर येथील निवडणूक लागली आहे.
सोमवारी (ता. ४ ) अर्ज माघारी घेण्याची अखेरची मुदत होती. अनेक ग्रामपंचायतींसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज माघारी घेण्यात आल्याने निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. बहुतांश ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढती होण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातील६५७ ग्रामपंचायत निवडणुकी च्या ६ हजार ३०१ जागेसाठी तब्बल २० हजार ९५२ अर्ज दाखल केला होता. त्यामुळे ४ जानेवारी २०२० अर्ज मागे शेवटच्या दिवशी ८ हजार जणांनी माघार घेतली.
६५७ ग्रामपंचायत निवडणूकी मध्ये ७० ग्रामपंचायत बिनविरोध होण्याचा मान मिळवला. त्यात माढा तालुक्यातील निमगाव टे या ग्रामपंचायत सलग ६७ वर्षे बिनविरोध याची परंपरा कायम राखली. माळशिरस तालुक्यातील चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. या चार ग्रामपंचायतींच्या मिळून ४० व अन्य १८ ग्रामपंचायतींच्या मिळून ५० अशा तालुक्यातील एकूण ९० जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. बार्शीत ९६ ग्रामपंचायत पैकी १४ ग्रामपंचायत बिनविरोध निवडणूक करण्यात आली. तर मोहोळ येथील ७६ ग्रामपंचायत पैकी १३ ग्रामपंचायत कारभाऱ्यानी बिनविरोध निवडून येण्याचा पण पूर्ण केला. त्यात माजी आमदार राजन पाटील यांच्या अनगर या ग्रामपंचायतचा ही समावेश आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ६५८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आजपासून गावोगावी प्रचाराचा धुरळा उणार असून सोमवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी अनेक इच्छुकांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. मात्र सरपंचपदाचे आरक्षण निश्चित नसल्याने काही गावांनी जरी अविरोध निवडी केल्या असल्या तरी सरंपचपदाचे आरक्षण व त्यानंतर कोणाची निवड करायची यावरुन पुन्हा एकदा वाद होण्याचीही अनेक गावांत शक्यता निर्माण झाली आहे. काही गावांनी सरळ दोन गटांत पॅनेल तयार करुन निवडणुकीस सामोरे जाणेच पसंत केले आहे.
0 Comments