बार्शी/प्रतिनिधी;
गेेल्या सहा महिन्यापासून सोलापूर जिल्ह्यातील वीज वितरणचे तब्बल १९७ कोटी रुपये थकले नागरिकांकडे अडकली आहे. लॉकडाऊन २४ मार्चला जाहीर झाले, सर्व व्यवसाय बंद पडले, रोजगार गेला, सध्या अनलॉक सुरू मात्र व्यवसाय पूर्वपदावर नाही, अशा वातावरणात लोकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. टाळेबंदीच्या काळा वीजबिल सक्तीने वसूल न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
लॉकडाऊनच्या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये सरासरी पध्दतीने ऑनलाइन बिले ग्राहकांना देण्यात आली. यानंतर बिले अदा करण्यात आली. ही बिले जेव्हा आली तेव्हा पूर्वी ऑनलाइन पध्दतीने देण्यात आलेल्या बिलांची अदा झालेली रक्कम वजा करण्यात आली नाही. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. या तक्रारी सोडवण्यासाठी महावितरणने प्रत्येक उपविभागीय कार्यालयात तक्रार निवारण केंद्र सुरू करण्यात आले. याद्वारे तक्रारी सोडवण्यात आले. लॉकडाऊनमुळे रोजगार गेला. त्यामुळे या कालावधीतले वीज बिल माफ करण्याची मागणी अनेक पक्षांनी केली. त्यामुळे बिले माफ व्हावेत, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली. म्हणून बिले भरण्याचे प्रमाण कमी झाले.
सध्या ४,११,५६८ घरगुती वीज ग्राहकांचे १४१ कोटी ५९ लाख रुपये, ४२,७९० व्यापारी वीज ग्राहकांचे ३० कोटी ८१ लाख रुपये, ९४३५ औद्याेगिक वीज ग्राहकांचे २४ कोटी २९ लाख रुपये असे एकूण ४,६४,४११ लघुदाब वीज ग्राहकांचे १९६ कोटी ६९ लाख रुपये थकीत आहे. यंदाच्या सप्टेंबर महिन्यात लघुदाब वीज ग्राहकांनी ६६ लाख रुपये वीज बिल अदा केली आहेत.
0 Comments